शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व समजावे, त्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि नीलकंठ प्रकाशन तर्फे विविध पुस्तके विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांकडून महाभारत ह्या पुस्तकातील कथांचे नियमित वाचन घेण्यात आले.
तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देत वर्गावर्गात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अक्षरावरून शब्द तयार करणे, वाचाल तर वाचाल या विषयावर उत्स्फूर्त चारोळी लेखन करणे,मराठी लेखक,कवी, संत ह्यांवर आधारित फिरवा चक्र सांगा माहिती म्हणजेच स्पिन व्हील असे उपक्रम घेण्यात आले, 'ऐटीत मराठी' हे गीत विद्यार्थांनी सादर केले.
मराठी भाषा विषय शिक्षकांनी मुखाध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे नियोजन केले होते.